शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सांगली जिल्ह्यात ९४६९ हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:30 IST

सांगली : जिल्ह्यात यंदा साखर कारखान्यांना ८९ हजार ९१८ हेक्टर उसाचे क्षेत्र उपलब्ध होणार आहे. भाजीपाला, कडधान्य पिकांना हमीभाव नसल्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे वळल्याचे दिसत आहे

ठळक मुद्देदराचा धोका : सिंचन योजनांमुळे दुष्काळी भागात जादा कलकारखानदारांकडून भविष्यात आर्थिक कोंडी होण्याची भीती

अशोक डोंबाळे ।सांगली : जिल्ह्यात यंदा साखर कारखान्यांना ८९ हजार ९१८ हेक्टर उसाचे क्षेत्र उपलब्ध होणार आहे. भाजीपाला, कडधान्य पिकांना हमीभाव नसल्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे वळल्याचे दिसत आहे. वाढत्या उसाच्या क्षेत्राचाही धोका असून, कारखानदारांकडून भविष्यात आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी गेल्या हंगामामध्ये ७१ लाख ६१ हजार ३५९ टन उसाचे गाळप करून ८८ लाख १३ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. यावेळी जिल्ह्यात ७२ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र होते.ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ आणि वाकुर्डे उपसा सिंचन योजना सुरू झाल्यामुळे ८४४९ हेक्टर उसाचे क्षेत्र वाढले. १४ साखर कारखान्यांनी ९० लाख टन उसाचे गाळप केले व ९८ लाख क्विंटल साखरेचे विक्रमी उत्पादन घेतले. मात्र उत्पादन प्रचंड वाढल्यामुळे साखरेच्या दराचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्ह्यातील कारखान्यांचा हंगाम संपून दोन महिने झाले, तरीही शेतकऱ्यांना अंतिम बिले मिळाली नाहीत. हंगाम सुरू झाल्यापासून साखरेचे दर घसरत आहेत.

परिणामी राज्य बँकेकडून साखरेचे मूल्यांकन कमी करण्यात आले. बँकांकडून पैसे उपलब्ध होत नसल्याने एफआरपी देतानाही कसरत करावी लागत आहे. कारखान्यांना जाहीर केलेला दर देता आलेला नाही. साखरेचे दर पडल्याने उसाला प्रतिटन २५०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या कारखान्यांनी एफआरपीएवढी किंवा त्यापेक्षाही जादा रक्कम पहिल्या हप्त्यापोटी देऊ, असे सांगितले होते, त्यांनीही साखरेचे दर खाली येताच एफआरपीची रक्कम देण्यातही हात आखडते घेतले आहेत. कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये आले आहेत. दोन महिन्यांपासून उसाच्या पहिला हप्त्याचे सुमारे २५० कोटी रुपये थकले आहेत. मात्र भाजीपाल्यातील दराचा धोका लक्षात घेऊन शेतकरी पुन्हा ऊस लागवडीकडेच वळला आहे.

कोबी, ढबू मिरची, दोडक्यास दर नसल्यामुळे तो फेकावा लागल्याच्या घटना मागील महिन्याभरात जिल्ह्यात घडल्या. तूर, मूग, सोयाबीनलाही हमीभाव नसल्यामुळे दर वारंवार कमी होत आहेत. यापेक्षा ऊस पिकाला धोका कमी आणि एफआरपीचा दर निश्चित केला आहे. याचा विचार करूनच शेतकरी उसाची लागवड करू लागला आहे. मात्र वाढत्या ऊस क्षेत्राचा शेतकºयांबरोबरच साखर कारखानदार आणि शासनालाही धोका आहे. शेतकºयांना एफआरपीनुसार दर देणे कायद्यानेच कारखानदारांना बंधनकारक आहे. कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये गेल्यास शासनालाच कोट्यवधीची भरपाई द्यावी लागणार आहे.

शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्यात दोन ते तीन हजार हेक्टरने, तर तासगाव, खानापूर, जत, आटपाडी या दुष्काळी तालुक्यात दुपटीने उसाचे क्षेत्र वाढले आहे. दुष्काळी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आणि पाणीही कमी उपलब्ध होत आहे. तरीही शेतकरी उसाची लागवड करण्याकडे वळत आहे.जिल्ह्यातील उसाचे क्षेत्रतालुका २०१७-१८ २०१८-१९मिरज १४०८२ १३८११वाळवा २५०७० २७२८६शिराळा ५९५७ ७९२४तासगाव ३६६८ ७१२४पलूस १०१३६ ११०८८एकूण ८०४४९ ८९९१८तालुका २०१७-१८ २०१८-१९खानापूर १२३३ ३०२९आटपाडी ४०५ ९१४क़ महांकाळ३७२५ २२८३जत ५०८ ८६९कडेगाव १५६६५ १८१६४

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने